अलिबाग, दि.१- समुद्राच्या खाऱ्या पाण्यामळे नापिकी होणारी भातशेती अलिकडे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पेजेपुरते देखील धान्य देईनाशी झाली आहे. खत, बियाणे यांच्या वाढत्या किंमती, मजुरीचे चढे दर यामळे आधीच शेती व्यावसाय तोट्यात आहे. आणि त्यातही नैसर्गिक आपत्तीने त्रेधा उडविली को, सार संपून जातं. यातून उभारी घेण्यासाठी म्हणून आता शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक व्यवसायावर भर दिला आहे. या अंतर्गत हाती घेण्यांत आलेल्या योजनांपैकी मागेल त्याला शेततळी खोदण्याचा धडक कार्यक्रम राबविला जात आहे. २०x२०४३ आकाराच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनदान शासनाकडन देण्यात येत आहे. शिवाय ही रक्कम फेडायची नसन त्यावर व्याज आकारणी देखील केली जात नाही. म्हणूनच या योजनेचा लाभ शेतकरी मोठ्याप्रमाणावर घेऊ लागले असन आपापल्या शेतात तळी निर्माण करु लागले आहेत. आधीच मत्स्यशेतीला शेतकरी प्राधान्य देऊ लागला असतांना आता मागेल त्याला तळे मिळू लागल्याने प्रत्येकाच्या शेताच्या कोनाड्यात तळे दिसू लागणार आहे. अशी छोटेखानी तळी यापूर्वी शेतकरी रोजच्या जेवणासाठी मत्स्यपाळणासाठी करीत असत विशेषतः मास्यांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या सर्वात चविष्ट अशा जिताडा मास्याचे संवर्धन करण्यावर शेतकऱ्यांचा अधीपासूनच भर असल्याने येत्या काळात खारेपाटातील खलाटी जिताडा माशासाठी ओळखली जाईल सर्वच शेतकऱ्यांनी हा अनदानाचा लाभ घेण्याचे ठरविले तर खया अर्थाने खारेपाटात जितायामास्यांचा पाट वाहिल्याविनाराहणार नाही. मात्र भातशेती तोट्यात असतांना मत्स्यशेतीला तीला मात्र सगीचे दिवस आले आहेत परंतु दरम्यानच्या काळात काळात याभागात अन्य विकासाची कसलीही चक्र फिरविण्याचा विचार शासनकर्त्यांनी करु नये. अशी तकर्यांनी करू नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.
यापुढे खारेपाटात वाहणार माशांचा पाट