यात्रा, सण, उत्सव स्थगित करावेत, लग्नकार्य पुढे ढकलावीत.
पेण, दि.२०- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आज एक महाभयंकर संकट संपूर्ण देशावर आले आहे. त्यात आपल्या महाराष्ट्र राज्यात तर जणू युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या दहा-पंधरा दिवसाचा काळ तर अत्यंत आणीबाणीचा असणार आहे. हा संसर्गजन्य आजार संपूर्ण जगाला नवा असल्याने त्याच्या भयानकतेचा अंदाज अद्याप कुणालाच आलेला नाही. तरी देखील चीन, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये उदभवलेली भयावह परिस्थिती पाहता त्याच्या तीव्रतेची कल्पना आली आहेच. तरी ही परिस्थिती ओळखून आपण घाबरुन न जाता, पण गाफीलही न राहता हिता जागरुकपणे आपली काळजी " घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे " टाळावे आणि यासाठीच गर्दी होईल ' अशी लग्नकार्य पुढे ढकलावीत. सण, उत्सव, यात्रा स्थगित कराव्यात. वाढदिवस, महापूजा असे गर्दी करणारे सर्वच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम एक रद्द करण्यात यावेत. असे जाहीर आवाहन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष " सूर्यकांत पाटील यांनी समस्त , आगरी समाज बंधू-भगिनींना केले आहे. ' रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या सूचनांवरुन हे आवाहन करतांना सूर्यकांत पाटील म्हणाले की, कोरोना हा महाभयकर आजार आहे. अद्याप त्यावर काणताहा पारणामकारक उपाय सापडलेला नाही. जगात उडालेला " हाहाकार पाहता या रोगावर आपण नियंत्रण मिळविले नाही तर तर सभाव्य धाका कल्पना करता येणार नाही असा उद्भवू शकतो. म्हणून आताच आपण सतर्क हो ऊना त्याचा पैलावा रोखण्यासाठी सामहिकरित्या खबरदारी घेतली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये देशांतील सर्वच व्यवहार ठप्प लॉकडाऊन सुरु केले आहे. महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असतांना आपण मात्र निष्काळजीपणे मोठ्या गर्दीची लग्नकार्य करीत आहोत. आणि याचवेळी भयानक मोठ्या संकटाला आपण आमंत्रण देत आहोत हे मात्र विसरत आहोत. याचा गंभीरपणे विचार करुन जुळलेली लग्न पुढे ढकलण्यात यावीत. आणि हे संकट टळल्यावर ती जरुर करावीत. ही परिस्थिती ओळखून सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अशा वधू-वरांना जिल्हा प्रशासनाकडून प्रशस्तिपत्र देऊन तालुक्यांतील सर्वात गौरविले जाणार आहे. असे सांगतानाच मार्च-एप्रिल महिना हा आगरी समाजाचा सण, उत्सव, यात्रांचा असतो. या निमित्त देखील येथे मोठा जनसमुदाय उसळत असतो आणि त्यात कोण बाधित घुसलेला आहे. हे कळणे तसे मुश्किलीचे होणार आहे. म्हणून अशा या जीवनमरणाच्या संकट समयी आपण हौसेमौजेला काहीशी मुरड घातली पाहिजे. आणि या वर्षीचे सर्व सण, उत्सव, यात्रा रद्द केल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. यावेळी आपल्या गावात आणि परिसरात विदेशातन परतलेली कोणी व्यक्ती . आढळल्यास वा त्याच्या हातावर शिक्का मारलेला असून तो मुक्तपणे लोकांमध्ये फिरत असेल तर याची माहिती प्रशासनाला जरुर द्यावी. म्हणजे त्याच्याकडून होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गापासून समाजाला वाचविणे आपल्याला सहज शक्य होईल. असेही त्यांनी शेवटी सांगितले.
गर्दी करुन लग्न केल्याने माजलगावात गुन्हा दाखल
माणसांच्या संपर्कातून पसरणारा जीवघेणा कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लादनही जनता ऐकत नसल्याने आता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यानुसार माजलगाव तालुक्यांतील एक किलोमीटरवर असलेल्या ब्रम्हगाव येथे जमाव जमवून लग्न लावणारे वर, वधू यांचे आई-बाप, भटजी फोटोग्राफर मामा.करवल्या अशा एकण आठजणांवर गन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूरमध्ये २५० वहाडींवर गुन्हे
शिरूरमध्ये २५० वहाडींवर गुन्हे कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश धुडकावून लग्न सोहळा आयोजित केला म्हणून निघनवाडी येथे लग्नासाठी जमलेल्या अडीचशे वहाडींवर पोलिसांनी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.