लोकसेवक वडखळ येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्रेश्वर मुंबई-गोवा महामार्गावर दृष्टांत माहिती मंदिराच्या गाभाऱ्यात वाघ

     


          मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गाव असून त्याच्या दक्षिणेस रेल्वे रस्ता ओळांडल्यावर श्री क्षेत्रेश्वराचे स्वयंभ मंदिर आहे. तीन डोंगरांच्या मध्यभागी विलोभनीय निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरातले हे मंदिर मनःशांतीचे उत्तम ठिकाण आहे. म्हणूनच येथे ध्यानसाधना करण्यासाठी देखील अनेक भक्तगण येत आतात. गुहेच्या आकाराच्या डोंगराच्या घोळात श्री क्षेत्रेश्वर विसावले असल्यानेच या परिसराला 'घोळनगर असे नाव पडले आहे. तेथे जाताक्षणी माणसाचे मन प्रसन्न वातावरणाने भारुन जाते. श्री क्षेत्रेश्वर मंदिरा शेजारीच संत ज्ञानेश्वर माऊलींचे अति सुंदर असे मंदिर असल्याने ही भूमी 'देवाची नवी आळंदी' देखील ओळखली जाते. त्याच कारणहा तितकच सयुक्ताक असेच आहे. देवाच्या आळंदीत श्री ज्ञानेश्वराच्या समाधीच्या बाजूला श्री शंकराचे मंदिर आहे. त्याच पध्दतीची रचना श्री क्षेत्रेश्वर येथे पहायला मिळत असल्याने तसा उल्लेख भक्तगण करताना दिसत आहेत. श्री क्षेत्रेश्वर देवस्थान हे प्राचीनकाळीन असून देवाच्या अनेक वेगवेगळ्या अख्यायिका सांगितल्या जात आहेत. अनेक पिढ्यांचे रक्षण श्री क्षेत्रेश्वरांनी केले असल्याची मान्यता आहे. म्हणूनच त्याला लोक आपला क्षेत्रपाल असेच संबोधित आहेत. कालांतराने देवस्थानाचे नाव हे श्री क्षेत्रेश्वर असे प्रसिध्दीस आले. सुरुवातीच्या काळात वडखळ-वावे या ग्रामस्थांनी या ठिकाणी असलेल्या क्षत्रपालाच्या पिडीवर झोपडीवजा छत्र उभ कल. पुढ-पुढ भक्तगणाना चार खाबा कालारु छाटखाना मादर उभ केले. मग त्यात प्रतिष्ठापना झालेल्या देवाची नित्य पूजाअर्चा होऊ लागली. भक्तांची प्रार्थना फळास येऊ लागली. त्यांना अनुभूती येऊ लागल्याने सपूर्ण परिसरात भक्तांच्या हाकेला धाऊन येणारा, नवसाला पावणारा याची ख्याती साऱ्या जिल्ह्याभर पसरली. काही वर्षांपूर्वी वडखळ-वावे परिसरातील लाकाना लाकवगणातून सुदर अस मंदिर बांधले आहे. या मंदिराची उभारणी ९० च्या दशकात झाली.


                                                                          दृष्टांत माहिती


पूर्वीचे घोळनगर परंतु सध्याचे नवे नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील स्व भिकू बाळू म्हात्रे या शेतकऱ्याने आपल्या मशागतीसाठी शेतात नांगर धरला हेता. अचानक नांगराचा फाळ (सुरका) क्षेत्रेश्वराच्या पिंडीला लागला की काय? परंतु ज्या प्रमाणे महादेवाच्या जटेतून जशी गंगा प्रगट व्हावी तद्वत फाळ लागलेल्या ठिकाणाहून पाण्याची उंच धार उडू लागल्याने त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. मग त्याने हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. हा प्रकार प्रत्यक्ष पाहून सारे ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले. ही वार्ता हाहा म्हणता वाऱ्यासारखी पुया टापूत पसरली. अचंबित झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी मग त्या ठिकाणी थोडेसे खोदकाम केले असता त्याच्या दृष्टास चक्क स्वयंभू शिवलिंग पडले. ज्या ठिकाण हे शिवलिंग सापडल तथ जमिनीच्या आठफूट खोलात दोन्ही बाजूस कांजळ व पाण्याचा ओहोळ असल्याचे आढळून आल. हा चमत्कार घाडल्यापासून आसपासच्या गावांतील लोकं श्री क्षेत्रेश्वराची भक्तीभावाने पूजापाठ करु लागले.


                                                                        दृष्ट्रांत दुसरा 


वडखळ नाक्यावरील प्रकाशशेठ नावाचे एक व्यवसायिक नित्यनियमाने अगदी सांजावण्याच्या समयास दिवाबत्ती करण्यासाठी म्हणून मंदिरात जात असे. बेलाची पाने पिंडीवर वाहून मनोभावे पूजा करीत असे. आपल्या आवडीची पाने अर्पण करुन एक भक्त अशी नित्यनेमाने आपली भक्ती करतो. हे पाहून श्रीक्षेत्रेश्वर प्रसन्न झाले. आणि एके दिवशी प्रकाशशेठ यांना दष्टांत दाखविला. बेलपर्ण वाहता वाहता पिंडीवर चक्क स्वयंभ श्री क्षेत्रेश्वराचा चेहरा प्रकट झालेला पहायला मिळाला. हा घडलेला साक्षत्कार त्यांनी गावात येऊन ग्रामस्थांना कथन केला. आणि त्याच दिवशी त्यांनी चांदीची मूर्ती आपण मंदिरास अर्पण करीत असल्याची घोषणा केली. यामर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना केली. तेव्हापासन आजतागायत याच मर्तीची भाविकभक्त पजा करीत आहेत.


                                                                            दृष्ट्रांत तिसरा


दष्टांत तिसरा फारपूर्वी श्री क्षेत्रेश्वराचा संपर्ण परिसर म्हणजेच सद्याचा घोळनगर हा घनदाट जंगल होता. मोठ-मोठ्या झाडा-झुडपांनी व्यापलेला होता. काहीसं निर्जन ठिकाण. कच्चा आणि तोही अरुंद रस्ता. त्याकाळी वीज नव्हती. त्यामळे सर्वत्र अंधार दाटलेला असायचा. आणि झाडांच्या गर्दीमुळे तर परिसर रात्र होण्याआधीच अंधारात बुडून जायचा. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्याच्या मनात भीती दाटून माणूस गई. यासंदर्भात अशा अख्यायिका आहे अशावेळी श्री क्षेत्रेश्वर मानवरुप का, धारण करुन त्या भाविकास गावापर्यंत सोडून अदृश्य होत असे. हा अनुभव अनेक भक्ताना आल्याचे सांगितले जाते. 


                                                                             दृष्टांत चौथा


घनदाट जंगल असल्यामुळ जंगली प्राण्यांचा देखील या परिसरात वावर होता. उत्सव काळात, भजन-कीतन आटोपल्यावर काही भक्तगण मंदिरातच झोपी जात. याचवेळीमंदिराच्या गाभाऱ्यात वाघ येऊन दर्शन घेऊन गेल्याचे पहाटेच्या समयाला त्यांच्या दृष्टीस पडले. पण तेथे असलेल्या कुणालाही त्यांनी इजा केली नाही असे सांगितले जाते. 


                                                                               दृष्टांत पाचवा


आज क्षेत्रेश्वर नावाने प्रसिध्द असलेले हे मंदिर पूर्वी क्षेत्रपाल म्हणून ओळखले जात होते. वडखळ क्षेत्राचा रक्षण करणाऱ्या या देवाने अनेकदा लोकांना प्रत्यक्ष दृष्टांत दाखविला आहे. लोकं अगदी साखर झोपेत असतांना गावाच्या गल्लीबोलातून चुंगराचा आवाज येऊ लागे. लोकं जागी होऊन खिडक्या उघडू लागत तेव्हा अनेकांना सफेद नंदीवर बसलेला जटाधारी, दाढी वाढलेला माणूस दिसे. तो गावाला प्रदक्षिणा पालीत फिरे तेव्हा लोकांच्या क्षेत्रेश्वर  आपले रक्षण करीत आहे. ध्यानात आले की, साक्षात श्री क्षेत्रेश्वर . आजही तितक्याच भावाने पहायला मिळते. म्हणूनच दर सोमवारी, श्रावणात आणि महाशिवरात्रीला भाविक भक्तांची मंदिरात दर्शनासाठी रीघ लागते.